घडव पुन्हा एक शिवबा आता........





महाराष्ट्राची ही पावन भूमी
संताची लाभली पुण्याई
भगवी पताका शिवनेरीची
फडकू दे आता दारोदारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || १ ||

एक एक थेंबातुन दुधाच्या
पाज शौर्य तव बाळासी
नको खेळणी नकोत गोष्टी
नको रात्री ती अंगाई
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || २ ||

होउनी मैतर, मावळा, दादोजी
शिकव रणांगण आणि लढाई
निष्पापांचे रक्त सांडते
अश्रु ढाळी माय भवानी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ३ ||

घर आपुलेच जाहले रणभूमि
आप्ल्यांशिच आपली लढाई
ओरबाडुनि माझ्या मातृभूमीला
राज्यकर्ते आपुली भाजती पोळी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ४ ||

होईल का ग पुन्हा एकदा
इतिहासाची पुनरावृत्ती
एक जाणता राजा मांगे
धाय मोकलून माय मराठी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ५ ||

संहार करू दे
विनाशाचा, नराधमांचा, आतंकाचा
लखलखु दे तलवार विजयी
गर्जु दे पुन्हा एक मर्द मराठा
सह्याद्रीच्या कड़ेकपारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ६ ||

.

काळजाचे तुकडे..



फुटलेल्या माझ्या काळजाचेतुकडे येऊन समेट;
एकदाच फक्त तूमला एकदाच येऊन भेट.

काळ सरलाऋतु बदलले,
तरी मन तुझ्या आठवणींचा माग काही सोडत नाही;
वारे बदलले,दिशा संपल्या,
पण तुझ्याशिवाय या मनाचाठाव कुठंही जडत नाही.

निस्तेज ह्या ह्रदयाला,
तुझ्या आठवांचा सुर्य प्रकाश देतो;
निष्पर्ण ह्या जीवनाला,
तुझ्या येण्याच्या आशेने पालवी देतो.

तुला शपथ आहे माझ्या प्रत्येक श्वासाची;
घशात अडकलेल्या प्रत्येक घासाची;
वादळ होवारा होपाऊस बनून धाव;
एकदाच माझ्या ह्रदयावर घालमिलनाचा घाव;
आणि मगफुटलेल्या माझ्या काळजाचेतुकडे येऊन समेट..

.

-- शब्द माझे मज सोडुन गेले.......



शब्द माझे मज सोडुन गेले
कवीतेचे घर मोडुन गेले

विनवणी केली मी त्यांना
आज मलाच ते रडवून गेले


कश्या करू मी कवीता

झालो मी पुरता रीता
कशी करू मनधरणी
कळेना मज काही आता

मी असा काय गुन्हा केला
शब्दांनी का मज दगा दिला
शब्द बोलले सांगु लागले
तुच तर फसवीलेस आम्हाला


अरे वेड्या शब्द हे आहे हत्यार
जाई काळजाच्या आरपार
तु का विचार केला नाही
चालवले ते शब्द बेसुमार

शब्द बोलता ना तोलुन घे
त्यांना सोबत जगुन घे
वापर त्यांना कुठेही आधी
त्यांच्याही भावना जाणुन घे

कळले मला दु:ख शब्दाचे
नाते जुळले आमचे प्रेमाचे
करतो मी आज कवीता
भान ठेवतो शब्दाच्या वारांचे

शब्दही देती साथ मला
मी ही जपतो त्यांच्या भावनेला
जगतो त्यांच्या समवेत
रंगवीतो शब्दांनी कवीतेला

.

मी नसेन तर...!

एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"

मी नसेन तर...!







ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"



.
एकदा त्याचे आणि तिचे भांडण झाले.तो तिच्यावर रागावून बसला.तिने त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला.
पण तो काही ऐकेच ना! शेवटी रागाने ती ही म्हणाली.."मी आहे तर इतका रागावतो आहेस,मी नसेन तर काय करशील?"



मी नसेन तर...!







ती : तुझ्या आयुष्यात मी नसेन तर सांग कसा जगशील?
कोणाच्या डोळ्यात स्वत:ला बघशील?
कोणाच्या आसवांना टिपशील?
कोणाच्या निरर्थक गप्पांमध्ये रमशील?
कोणाच्या ओठावर हासू फ़ुलवशील?
कोणावरून मित्रांमध्ये मिरवशील?

बाईक ची मागची सीट जेव्हा रिकामी राहील,
समोरचा आरसा ही जेव्हा माझी वाट पाहील,
ट्राफ़िकचा गोंगाट ही जेव्हा शुल्लक वाटेल,
ती १० मिनिटेही एका तपासारखी भासतील,
सांग तेव्हा काय करशील?

कामात बुड्वून जरी घेशील स्वत:ला,
माझी आठवण येताच...
मोबाइलवर लक्श नकळत जाईल,
पण तो वाजणार नाही...
तुला काहीतरी चुकचुकल्यासारखे नक्की वाटॆल...
सांग तेव्हा काय करशील?

मी नसेन तर ...
तुला चित्रपट रटाळ वाटेल...
सुन्दर धुनही बेकार वाटेल...
पुस्तकही नाराज वाटेल....
मनातून नक्की तळमळशील..

दिवसभर दुस-यांच्या चाणाक्श नजरेपासून लपशील...
उगाच किना-यावर माझी वाट बघशील...
संधीकाळी हुरहुरशील...
माझ्या आठवाने बेचैन होशील..
पण अलगद आपले दु:ख पिऊन टाकशील...
मावळत्या सूर्याला आपल्या अश्रूंचे अर्घ्य देऊन...


गर्दीतही एकटा राहशील,
पुन्हा पुन्हा मागे पाहशील,
मी नजरेस पडणार नाही...
हताश होऊन जड पावलांनी पुढे चालशील..
तू ही त्याच गर्दीत हरवून जाशील.....कुठेतरी...

तू लाख स्वत:ला रमवशील,
दुस-यांमध्ये स्वत:ला हरवशील,
नवीन ना्त्यांना जोडशील....पण
खरच सांग .........
"काय मला विसरू शकशील???"


तू माझ्याशी लग्न करशील...



एक अनोळखी मुलगा येईल,
तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.
तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच,
तो लग्नाला होकार देईल.

मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच,
तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.
पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पेक्षा,
तू माझ्याशी लग्न करशील....

मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,
कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,
हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,
तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..

तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,
त्याला ही भीक द्यायला तयार होतील,
पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील...

यदा कदाचित,
तो मुलगा चांगला निघाला तरी..
फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,
तो लग्नाला होकार देईल..
तुझे पालक ही त्याचे रूप आणि
मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,
हे पाहून लग्नास मान्यता देतील.

पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,
काय तू जीवनभराच नात जोडशिल..अग
एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,
तू माझ्याशी लग्न करशील.....


तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..
तू माझ्या हृदयात राहशील..
तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..
मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..

हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,
मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..
तरी पण..........एका अनोळखी मूलाशी लग्न करण्या पेक्षा,
तू माझ्याशी लग्न करशील....


एक अनोळखी मुलगा येईल,


तुझ मन नाही,तुझ रूप पाहील.

तुझ्या सुंदरतेवर भाळुन नक्कीच,

तो लग्नाला होकार देईल.



मान्य आहे, तुझ्या चांगल्यासाठीच,

तुझे आई-वडील हा निर्णय घेतील.

पण एका अनोळखी मुलाशि लग्न करण्या पेक्षा,

तू माझ्याशी लग्न करशील....



मग,तुझ्या भावनांशी खेळले जाणार,

कुणी बोलायला ,तर कुणी चालायला सांगणार,

हे सर्व झाल्यानतर, हुंडयाच्या नावाखाली,

तो तुझ्या आई-वडिलांकडे भीक मागणार..



तुझ्या चांगल्यासाठीच, तुझे आई वडील,

त्याला ही भीक द्यायला तयार होतील,

पण एका भीकार्‍या शी लग्न करण्या पैक्शा,

तू माझ्याशी लग्न करशील...



यदा कदाचित,

तो मुलगा चांगला निघाला तरी..

फक्त जीवनाशी तडजोड म्हणून,

तो लग्नाला होकार देईल..

तुझे पालक ही त्याचे रूप आणि

मुखय म्हणजे किती हजारांची नोकरी आहे,

हे पाहून लग्नास मान्यता देतील.



पण जीवनाशी तडजोड करणार्‍या श्रीमनताशी,

काय तू जीवनभराच नात जोडशिल..अग

एका हृदयाने भिकारी मुलाशि लग्न करण्या पैक्शा,

तू माझ्याशी लग्न करशील.....





तो तुला बायको म्हणून घरात ठेवेल..

तू माझ्या हृदयात राहशील..

तो तुझ्या भावनाना समजावून घेण्याचा प्रयत्न करेल..

मी त्याच भावनांशी माझे नाते जोडेल..



हृदयतून निघालेल्या माझ्या या शब्दांवर,

मला माहीत आहे तू नक्कीच हसशील..

तरी पण..........एका अनोळखी मूलाशी लग्न करण्या पेक्षा,

तू माझ्याशी लग्न करशील....

तू आणि तूच...



तू माझ्या जीवनाचा शिल्पकार
तू मला घडवलेस,
तूच मला वाटलास दिलदार
तू माझे ह्रद्य चोरलेस.

तुझ्यामुळे माझे दुःख झाले कमी
मला वाटले कधींना कधी,
मी तुझ्या दुःखात येईन काम
तुझ्या मनातले आधी सांग.

माझे मन तुला कधी कळणार
जे फक्त तुझेच झाले,
मी तुझे हृद्य कधी चोरणार
जे तुझ्यासाठी परके झाले.

समोर आलास की होतोस परका
त्यावेळी मला वाटते,
की तू मला दिलास धोका
त्यावेळी रडू येते.

मी प्रेम केले
हा माझा होता का गुन्हा?
तू सांग मला
हा गुन्हा करीन मी पुन्हा.

माझ्यात असतील चुका
मी मान्य करते,
तू प्रेम नाही केलेस
तरी मी तुझी पूजा करते.

तुझ्यासमोर आल्यावर
वाटते गुन्हेगारासारखे,
कारण तुला नेहमी वाटते
मी प्रेम करते वेड्यासारखे.

माझी नाही लायकी
तुझ्यावर प्रेम करण्याइतकी,
तू समजू नको मला परकी
तुला विसरण्याइतकी.

तू माझ्यावर प्रेम करावे
अशी नाही जबरदस्ती,
जरी प्रेम केले नाहीस
तरी ठेव माझ्याशी दोस्ती.

                                               -  पुष्पलता घाडीगावकर  (निधी घाडी )