आता नाही आठवायचं...


मागे वळुन पुन्हा,
आता नाही बघायचं...

विसरलेल्या आठवणींना,

आता नाही आठवायचं...


चुकार हळव्या क्षणात,

आता नाही फसायचं...

अपेक्षांचे ओझे आता,

मनावर नाही बाळगायच...



नागमोडी वळणावर आता,

नाही जास्त रेंगाळायचं...

निसरड्या वाटेवर आता,

नाही आपण घसरायचं...



स्वतःच्या हाताने आता,

स्वतःला सावरायचं...

नी स्वतःचे आयुष्य,

स्वतःच आपण घडवायचं साधं सोपं आयुष्य

साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं
जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...

.

पाऊस आलाय….भिजून घ्या





पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या


.

कशाला जगतोय माहीत नाही



कशाला जगतोय माहीत नाही,
कोणासाठी करतोय माहीत नाही
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..


निस्वार्थ मैत्रीची कधी लाभली साथ नाहि

निथळ प्रेमाचा कधी कुणीच दिला हाथ नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



पाहण्याआधीच ती तुटतील या

भीतीने कधी स्वप्न पाहीली नाही

पाहीली तरी ती पुर्ण करण्याची आमच्यात जीद्द नाहि
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



कधी कुणासाठी आमचं मन सांडल नाही

कधी कुणासाठी ते स्वत:शी भांडल नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



आमच्या मनातल्या इच्छा सागराएवढ्या खोल नाही

म्हणुनच आमच्या आयुष्याला काडीचही मोल नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



सावल्यांचा हा खेळ अजुन

आम्हाला समजला नाही

जगण्याचा खरा अर्थच अजुन आम्हाला उमगला नाही…..
साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



काही स्वार्थासाठी जगतात,

आम्हाला तर तेही जमत नाही

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..



कधी कधी वाटतं का हा व्यर्थ श्वास विझत नाही…….?

का मनातली जगण्याची आस कुजत नाही…?

साला आमच्या जगण्याला काही अर्थच नाही……..